अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्स पेडलर रिगल महाकाल याला अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी करून एनसीबीने रिगल महाकाल याला अटक करत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त केली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक […]
महाराष्ट्र
मोठी बातमी : राज्यात शिक्षकांची होणार पवित्र पोर्टलद्वारे भरती
मुंबई : माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. उर्वरित पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत बंदी घातली होती. मात्र आता ती भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 3 […]
#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये […]
महाराष्ट्रातील ‘या’ शेतकरी संघटनांचा भारत बंद’ला विरोध; कारण …
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद ची हाक दिली आहे. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. या बंदचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. आजच्या भारतबंदला राज्यातील स्वाभिमानी […]
#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा
नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना […]
७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
”उद्याचा भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजप सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही, #किसानों_के_संग_भारत_बंद” असे ट्वीट करत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यतील जनतेला भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. तसेच, “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या […]
महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्राद्वारेच बाबासाहेबांना अभिवादन केले असल्याचेही म्हटले आहे. जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहलेल्या पत्रातील मजकूर प्रिय बाबासाहेब, देशभरातील […]
#मराठाआरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर: अशोक चव्हाण
मुंबई : एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. ‘मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन तातडीने सुनावणी करण्याच्या […]
मराठा आरक्षणासाठी पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन; पुढील सुनावणी ९ डिसेंबरला होणार
मुंबई : ”मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होईल.” अशी माहिती मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठाची स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने 20 […]
शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा; चक्क तुकराम मुंढेनी केले कौतुक
मुंबई: सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रणजितसिंह यांच्या या कामगिरीचे कौतुक चक्क आयएएसअधिकारी तुकाराम मुंढे यांनी […]