औरंगाबाद : लहान बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी जात असतानाच भावंडांवर काळाने घाला घातला. दुचाकीवर जात असलेल्या तिघा जणांना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडले. यामध्ये तिघा सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या १८ ते २२ वर्ष वयोगटातील तीन लेकरं एकाएकी गेल्याने कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. एमआयडीसी वाळूज भागातील एनआरबी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील एक […]
मराठवाडा
नातेवाईकाला अखेरचा निरोप द्यायला गेले, स्वर्ग रथ उलटला; १२ जणांचा जीव थोडक्यात बचावला
नांदेड: जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम या गावातील अंत्यविधी उरकून परत येत असलेल्या स्वर्ग रथाला अपघात झाला. हा अपघात हिमायतनगर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दारूम उलुम जवळ घडला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले. यापैकी पाच जणांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे.जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे परसराम […]
परळीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ४०० व्यक्तीहून अधिक व्यक्तींनी घेतला लाभ
परळी : श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली थोरला मठ संस्थान वसमत आयोजित वसमत श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा मागिल १२ वर्षा पासुन आयोजित करण्यात येते. हजारो भाविकांचा त्या पदयात्रेत सहभाग असतो. या वर्षी भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले त्यात ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ घेतला. रेवली फाटा, परळी जिल्हा […]
नाटक सुरु असताना ‘सीते’चा लावणीवर ठेका; मराठवाडा विद्यापीठात ‘अभाविप’नं नाटक बंद पाडलं
औरंगाबाद: धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु असलेल्या युवक महोत्सवात एक नाटक बंद पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वाद निर्माण झाला असून यावरुन वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. युवक महोत्सवात नाटकांचे सादरीकरण सुरु असताना हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या […]
साहेब, अनुदानाचे पैसे लवकर द्या, आई दिवाळीला पोळ्या करेल, तुम्हीही या! लहानग्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्यात सत्तांतरं होत असताना शेतकऱ्यांची (Farmer) परिस्थिती मात्र जैसे थे अशीच आहे. सर्वांना अन्न धान्य पोहोचवणाराच बळीराजावरच अनेकदा उपासमारीची वेळ आल्याचं आपण पाहिलं देखील असेल. अशातच गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक हिसकावून घेतलं आहे. काही वेळा नुकसान भरपाई किंवा अनुदान देखील वेळेत मिळत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा […]
ट्रक आणि टेम्पोला भीषण अपघात: ५ जणांचा जागीच मृत्यू, इतर ५ गंभीर; वाहनांचा चक्काचूर
नांदेड : नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये मूळचे बिहारमधील असलेल्या ४ मजुरांसह एका ट्रक चालकाचा समावेश आहे. तसंच या अपघातात इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात […]
‘बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर’; प्रेयसीच्या तगाद्याला कंटाळून विवाहित तरुणाचं टोकाचं पाऊल
औरंगाबाद : विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या त्रासामुळे औरंगाबादमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर, असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) या तरुणाचं काही वर्षांपूर्वी लग्न […]
शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोरच खड्डा खोदून स्वत:ला गाडून घेतलं, कारण….
जालना : आपल्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी बदनापूर तहसील कार्यालयासमोर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आज अनोखं आंदोलन केलं. या मागणीसाठी एका शेतकऱ्याने खड्डा खोदून स्वतः ला गाडून घेत आंदोलन केलं आणि जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे. अद्याप पीक विमा न मिळाल्याने त्रस्त झालेल्या दाभाडी […]
‘ले गई दिल मेरा…’ वर थिरकली तारका, पोरं झाली घायाळ, धनुभाऊसमोरच पोलिसांचा लाठीचार्ज
गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र लाडक्या बाप्पाचा खास पाहुणचार केला जात आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या परळीत (parali) पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, त्यामुळे बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. https://twitter.com/echawadimedia/status/1565261268490940416 बीडच्या परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवाला (parali […]
अरे बापरे! जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील चित्रांचा रंग उडू लागला, चित्रेही धूसर
औरंगाबादः जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील चित्रांचा रंग उडू लागला आहे. काही चित्रे धूसर होऊ लागल्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाला आता चिंतेने ग्रासले आहे. चित्रांचे आहे त्या अवस्थेत जतन व्हावे, यासाठी येत्या काळात काही ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजिंठा येथे बौद्धकालीन लेण्या आहेत. त्यात अप्रतिम चित्रे रेखाटण्यात आली आहेत. चित्रांची रंगसंगती इतकी उत्तम आहे […]