नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पाठिंबा दिला असून दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी आज भारत बंदची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या बंदच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशा […]
देश
5G नेटवर्क कधी होणार सुरु? याबाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा
मुंबई : रिलायन्स जिओ २०२१ या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी केली आहे. दरम्यान, यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मक रित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचंही ते […]
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दहा-बारा दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता केरळ सरकारही उतरल्याचं दिसून आलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळचे कृषी मंत्री व्ही. एस. सुनिल कुमार म्हणाले की, […]
शेतकऱ्यांसाठी भारत बंद’ला देशभरातून समर्थन; तर अनुचित प्रकार न घडण्यासाठी केंद्राकडून नियमावली जाहीर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद’चे आवाहन केले आहे. भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर […]
धक्कादायक ! महिलेने चक्क 10 लाखांत केला नवऱ्याचा सौदा
जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर याठिकाणी अजब लग्नाचा एक गजब प्रकार घडला आहे. जबलपूरच्या एका महिलेने चक्क आपल्या पतीला विक्रीसाठी काढलं आहे. दहा लाख रुपयांच्या हव्यासापोटी हा प्रकार घडला असून नवऱ्याने ही विक्री थांबावी म्हणून समुपदेशन केंद्रात धाव घेतली आहे. या अजब प्रकारामुळे समुपदेशन केंद्र देखील चक्रावले आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्राला मिळालेल्या अर्जानुसार, जबलपूर येथील […]
देशात 2020 मध्ये या 10 नेत्यांना केलंय सार्वाधिक सर्च; महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश
नवी दिल्ली : 2020 हे वर्ष तसे कोरोनामुळे कायम लक्षात राहणार आहे. परंतु या वर्षात Yahooवर देशातील काही नेत्यांना मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश आहे. त्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे आहे. तर या यादीत क्रमांक एकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. देशातील सर्च केले गेलेले टॉप 10 नेते […]
भारत बंद’साठी केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक नियमावली जाहीर; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यसरकारांना दिले आहेत. काँग्रेससह देशभरातील 11 राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना […]
#शेतकरीआंदोलन : राष्ट्रपती भवनात पुरस्कार परत करायला निघाले होते खेळाडू; पण…
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. देशभरातील राजकीय पक्षांपासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत या आंदोलनाला पाठींबा मिळत आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे या आंदोलनात खेळाडूंनी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे. या आंदोलनाला खेळांडूनी पाठिंबा दिला असून आपला पुरस्कार परत करण्यासाठी काही माजी खेळाडूंनी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु राष्ट्रपती भवनकडून राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ […]
सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी दरवाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भाववाढ कायम राहिल्याने त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल वितरण कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. या नव्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर […]
किर्तन सुरु असतानाच झाली भांडणे; डोक्यात तबला घालून सहकाऱ्याची हत्या
नवी दिल्ली : किर्तन सुरु असतानाच डोक्यात तबला घालून सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्ली येथील आर. के. पूरम येथे घडली आहे. येथील गुरुद्वारामध्ये किर्तनादरम्यान दोन कर्मचाऱ्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात तबला घातला आणि त्यातच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रविंद्र सिंग असं […]