नागपूर : महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. श्वास नलिकेत अन्न अडकल्यामुळे गुदमरुन (चोकींग) त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार पुढे आले आहे. मात्र, प्राणघातक इंजेक्शन, व्हिसेरा, मोबाईल, लॅपटॉप, टॅब याचा चंद्रपूर व नागपूरातील रासानयिक परिक्षणाचा अहवाल तथा मुंबईच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल […]
बातमी
मोहम्मद अझरुद्दीनचा राजस्थानमध्ये मेगा हायवेवर भीषण अपघात
रायपूर : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची कार पलटी होऊन अपघात झाला आहे. राजस्थानातील सवाई माधेपूर येथे हा अपघात झाला आहे. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला. अझरुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला किरकोळ […]
शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियानाचे शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. मात्र काही अज्ञातांनी पंजाबमधील जिओच्या जवळपास 1500 हून अधिक टॉवरची तोडफोड केल्या […]
राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर न जाता नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. त्यात आता या निर्बंधांचही पालन करावं लागणार […]
संजय राऊतांचा भाजपाला इशारा; पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात 55 लाखांची ट्रान्सफर कशाकरता करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी 5 जानेवारीला हजर राहण्याचे ईडीने दिले आहेत. या प्रकरणी आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे. ईडीची […]
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर ब्रिटनहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो, अशी […]
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. पण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही.” अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]
साईभक्तांसाठी खूषखबर! संस्थानच्या वतीने घेण्यात आला मोठा निर्णय
नगर : साईभक्तांसाठी एक मोठी खूशखबर असून शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मात्र, भक्तांनी दर्शनाला येताना ऑनलाइन पास घेऊनच यावे, असेही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्री साईबाबा मंदिरात २५ , २६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या […]
शेतकरी-सरकारमध्ये आज चर्चा होणार; आजच्या बैठकीत तरी तोडगा निघणार का?
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचेशेकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. गेल्या महिनाभारत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्या मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच आज पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. त्यांमुळे आजच्या चर्चेत तोडगा निघणार का? याकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजता […]
अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले असल्याचा धक्कादायक खुलासा ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी केला आहे. टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी; तसेच इतरांचा सहभाग पडताळण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. इतकेच नाही, […]