नगर : कोरोना भयानक रुप आता समोर येत असून त्याचा प्रत्यय नगमध्ये आला. नगरमध्ये एकाचवेळी २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून दिवसभरात एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांचे अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा प्रकार अहमदनगरच्या अमरधाममध्ये घडला आहे. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात […]
पश्चिम महाराष्ट्र
कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीचीच नाहीत – संभाजी भिडे
सांगली : कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीचीच नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. मुळात करोना हा रोग नाही. हा रोग ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही, असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली […]
धक्कादायक ! पत्रकाराचे अपहरण करून निर्घृण हत्या
नगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून राहुरीतील येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले आहे. दातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी […]
रासपचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक
सातारा : राज्याचे माजी पशूसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे ३१ मार्च रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना एकूण तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार होता. त्यांच्यावर आज (ता. ०१) सातारा जिल्ह्यातील पळसावडे येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची […]
पत्रकार बाळ बोठेच्या वाढल्या अडचणी
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखीणच वाढ झाली आहे. आता विनयभंगाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात येईल. उद्या त्याला नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. जरे यांच्या हत्येपूर्वीच विनयभंगाची ही घटना घडली होती. मात्र, हत्येच्या घटनेनंतर संबंधित महिलेने पुढे येऊन फिर्याद दिल्याने […]
कोल्हापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल गावठी बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडवून लावण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोल्हापूर पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील डॉ. सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल गावठी बॉम्बने उडवून लावण्याचा कट जयसिंगपूर पोलिसांनी उधळून लावला. ही घटना आज […]
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा; मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार
मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधून समोर आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी नराधम मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा मेटगुताड ता. महाबळेश्वर) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. जगभरात महिला दिन साजरा होत असतानाच महाबळेश्वरमध्ये ही घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. दिलीप रामचंद्र […]
साताऱ्यात पेट्रोलने भरल्या विहीरी; शेतकरी त्रस्त
सातारा : पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पेट्रोल चोरीची एक घटना घडली आहे. फलटण येथील पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं […]
सातारा बसस्थानकात एकामागोमाग पेटल्या शिवशाही बस
सातारा : सातारा बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या सहा शिवशाही एकामागोमाग बस पेटत गेल्या आणि जळून खाक झाल्या. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र शहरात एकच खळबळ उडाली. आगीचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. सुरुवातीला एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर एकामागोमाग सहाही गाड्यांनी पेट घेतला. काही वेळातच सहाही गाड्या जळून खाक झाल्या आणि […]
शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस
कोल्हापूर : “दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली […]