चेन्नई : भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी विजय मिळवला. धावांच्या फरकाचा विचार करता हा भारताचा इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी १९८६ साली लीड्सच्या मैदानावर भारताने इंग्लंडला २७९ धावांनी हरवलं होते. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली […]
क्रीडा
ICC World Test Championship : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप
चेन्नई : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा […]
धोनी पार्थिवनंतर आणखी एका भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्ती
नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी आणि पार्थिव पटेल यांच्यानंतर भारताच्या आणखी एका यष्टीरक्षक फलंदाजाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नमन ओझानं सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्ये प्रदेशकडून खेळणाऱ्या ३७ वर्षीय ओझानं एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. ओझानं १४६ प्रथम श्रेणी सामन्यांत […]
दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर
चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने पकड मिळवली असून भारतीय संघ आता विजयापासून केवळ ७ पावले म्हणजेच ७ विकेट दूर आहे. ४८२ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली आहे. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या […]
अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान
चेन्नई : अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यानं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. अश्विन याच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली असून दुसऱ्या डावात सर्वबाद २८६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावातील कर्णधार विराट कोहली आणि अश्विनच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे डोंगलाएवढे मोठे आव्हान ठेवले आहे. अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारतीय […]
चहलबाबत विधान करणं युवराजला पडलं महागात; गुन्हा दाखल
मुंबई : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंहला इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह कार्यक्रमात युजवेंद्र चहलबद्दल केलेलं विधान चांगलंच भोवलं आहे. युवराज सिंहवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयणातील हिसारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली असून यामध्ये त्याच्यावर दलित समाजाचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. युवराज सिंह 1 जून 2020 रोजी एका लाईव्ह कार्यक्रमात […]
पुजारा झाला विचित्र पद्धतीने बाद; एकदा व्हिडिओ पाहाच
चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय टीमला तिसऱ्या दिवशी सकाळी झटपट ५ झटके बसले. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीनं तिसऱ्या दिवशी खेळ सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 26 रन्सवर आऊट झाला. बेन फोक्सनं त्याला सुरेख पद्धतीनं आऊट केलं. त्यापूर्वी भारतीय टीमची […]
अर्जुन तेंडुलकरचा धमाका; एका षटकात लगावले ५ षटकार
मुंबई : आयपीएलच्या २०२१च्या हंगामाची तयारी सुरु झाली असून अर्जुन तेंडुलकरने आपली नोंदणी केली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव आहे. पण या लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकर यानं अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुन तेंडूलकर यानं आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक […]
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
चेन्नई : भारतीय संघानं पहिल्या डावांत उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंड संघानं १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या होत्या. उपहारानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला असून पाहुण्या इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. फिरकीपटू आर. अश्विननं महत्वाचे तीन बळी घेत इंग्लंडला अडचणीत टाकलं आहे. […]
भारतीय फलंदाजीच्या बाबतीत घडला अजब योगायोग
चेन्नई : भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव ९५.५ षटकात संपुष्टात आला. योगायोगाची गोष्ट म्हणजे, पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही भारतीय फलंदाज ९५.५ षटकांतच बाद झाले होते. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांची अर्धशतके यांच्या जोरावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितने १६१ […]