टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन
कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन

टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन

टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं कोरोनामुळे निधन झालं. दिव्याला कोरोनाची लागण आणि त्यानंतर झालेल्या न्युमोनियामुळे तिची प्रकृती खालावत गेली. अशातच तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. मात्र अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. दिव्या भटनागरचा मित्र युवराज रघुवंशीने अभिनेत्रीच्या दिव्याचं निधन झालं असल्याचं जाहीर केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

34 वर्षांची दिव्यावर गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होती.दिव्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गुलाबो’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती. युवराज रघुवंशीने सांगितले की, ‘दिव्याचं निधन पहाटे 3 वाजता झालं आहे. दिव्याला 7 हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. रात्री अचनाक 2 वाजता तिची प्रकृती आणखी खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर 3 वाजता डॉक्टरांनी दिव्याचं निधन झालं असल्याचं जाहीर केलं. हे वृत्त माझ्या आणि दिव्याच्या कुटुंबासाठी मोठा धक्का होता. देव तिच्या आत्म्यास शांती देवो.’

तर दिव्याची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित दिव्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लिहिलं आहे की, “जेव्हा कोणीच कोणासोबत नव्हतं तेव्हा केवळ तूच असायचीस. दिवु तूच माझी होतीस, जिच्यावर मी रागावू शकत होते, रुसू शकत होते, माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकत होते. मला माहित आहे की, आयुष्यात तू खूप अडचणींचा सामना केलास. परंतु, आता मला माहिती आहे की, तू एका चांगल्या ठिकाणी आहे, जिथे दुःख, वेदना, खोटं यांसारखं काहीच नाहीये. तू सदैव स्मरणात राहशील दिवू. आणि तुलादेखील माहित आहे की, तुझ्यावर मी प्रेम करते आणि तुझी काळजी करत होते. मोठी तू होतीस, पण लहानही मुलगीही तूच होतीस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. जिथे कुठे आहेस तिथे आनंदी राहा. तू खूप लवकर निघून गेली मैत्रिणी.”

तर दुसरीकडे, दिव्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा नवरा गगन याचा कुठेही पत्ता लागत नाहीये. गगनने माझ्या मुलीची फसवणूक केली आणि तो फरार झाला असं तिने एका अहवालात म्हटलं आहे. त्याने तिला प्रेमात फसवलं आणि सोडून दिलं असा धक्कादायक खुलासा तिच्या आईने केला आहे.