चुकीच्या बातमीने गोंधळ, तुम्ही माझा व्हिडीओ बघा, चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो: सुबोध भावे
मनोरंजन

चुकीच्या बातमीने गोंधळ, तुम्ही माझा व्हिडीओ बघा, चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो: सुबोध भावे

पुणे : ‘लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलंय’, अशा आशयाचं वक्तव्य सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अनेकांनी त्यांच्या या मताला सहमती दर्शवली तर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं. अशातच, सुबोध भावे यांनी फेसबुक पोस्ट लिहून चुकीच्या बातमीने गोंधळ घातला. तुम्ही माझा व्हिडीओ बघा, माझं काही चुकलं असेल तर मी मनापासून माफी मागतो, असं म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे”, अशी खंत व्यक्त करत अभिनेते सुबोध भावे यांनी राजकारण्यांवर टीकास्त्र सोडले. सुबोधच्या याच वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. पण अनेकांनी सुबोधच्या रोखठोक वक्तव्यामुळे त्यांना ट्रोलही केलं. त्यानंतर सुबोध भावे यांनी फेसबुक पोस्ट लिहून याप्रकरणी खुलासा केला आहे.

सुबोध भावे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, “काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. (कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोहोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा संपूर्ण भाषण त्याच्या अर्थासहित बघा तरी एकदा”

https://www.facebook.com/subodhbhaveofficial/videos/788484942333987

पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. सुबोध भावे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थितीत ही नाटिका सादर झाली. त्यावेळी सुबोध भावे यांनी जोरदार भाषण केलं. हेच भाषण सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

सुबोध भावेंचं रोखठोक भाषण

राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच ‘मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत’, अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात,’ असे सांगत भावे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

“हल्ली आपण मुलांना हिंदी, मराठी गाण्यांवर नाचायला सांगतो. एखाद्या चित्रपटातील संवाद सादर करायला सांगतो. पुष्पा चित्रपटातील संवादांच्या सादरीकरणाचे खूळ आले आहे. ते करून देश घडणार नाही. याऐवजी जर मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यामध्ये देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल”, असंही सुबोध भावे म्हणाले होते.