उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली
मनोरंजन

उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली

उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये आज पुन्हा तीन मुली शेतात अत्यवस्थ स्थिती आढळून आल्या. त्यातील दोघीजणी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मरण पावल्या तर एक जन अद्यापही गंभीर जखमी आहे. या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री स्वर भास्करने संताप व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी थेट मागणीच तिने केली आहे. ट्वीट करत तिने ही मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वराने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होत असलेल्या अपराधांसाठी गुन्हेगाराला तेव्हाच शिक्षा होत नाही. जेव्हा लोकांचा विचार न करता मंदिर, गाय या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था यावर देखील तिने प्रश्न विचारला आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. स्वरासह अभिनेत्री रिचा चड्ढाने या घटनेवर ट्वीट केले आहे. त्यानंतर अनेकांनी ट्वीट करत या प्रकरणानंतर मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले होते. स्वरा भास्करने आता ट्वीट करत उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यशैलीवर बोट दाखवले आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती ट्विटरवर अनेक सामाजिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते. ती सोशल मीडियावर अनेक वेळा समोरच्यांची बोलती बंद करते तर काही वेळा तिला तिच्या मतांसाठी ट्रोल देखील केले जाते.

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील बबुरहा गावातील एका शेतात दोन दलित मुलींचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला होता. या दोन मुलींसोबत आणखी एका मुलीवर देखील अत्याचार करण्यात आले होते. त्या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलींना खाण्यातून विष देण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मीडियात दाखवण्यात आली होती. या घटनेमुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील ट्वीट करत या घटनेचा निषेध नोंदवला होता.