मुंबई : दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते वनराज भाटिया यांचे आज (ता. ०७) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ९३ वर्षीय वनराज यांनी आज ७ मे रोजी मुंबईत अंतिम श्वास घेतला. वनराज हे दीर्घकाळापासून वार्धक्याशी संबंधित आराजाशी लढत होते.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
१९७२ मध्ये भाटिया यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अंकुर या चित्रपटासाठी त्यांनी बॅकग्राउंड संगीत दिले. वनराज यांनी मंथन, भुमिका, जाने भी दो यारो सारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले. अजूबा या एकमेव चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले होते. १९८८मध्ये त्यांना तमस या चित्रपटासाठी संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर १९८९मध्ये त्यांना संगीत अकादमीतर्फे गौरविण्यात आले होते. २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
तत्पूर्वी, ३१ मे १९२७ रोजी वनराज भाटिया यांचा जन्म झाला होता. त्यांनी रॉयल अॅकेडमी ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९५९ मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल बनव्याचे काम सुरु केले. त्यांनी ७००० पेक्षा जास्त जाहिरातींसाठी जिंगल दिले. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये सगळ्यांचा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
RIP #VanrajBhatia .. apart from the many other brilliant musical works he created, I vividly remember the theme of ‘Tamas’ that started with a shriek so filled with anguish, it could send a chill up anyone’s spine and break anyone’s heart.
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 7, 2021