नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल १०८ जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात ही भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी ऋषी शर्माला अटक केली आहे. तो भाजपचा नेता आहे. त्याला रविवारी सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक केली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
पोलिसांनी शर्मा याची माहिती देणाऱ्यांसाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. याआधी शनिवारी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजप नेता ऋषी शर्माचे अवैध फार्म हाऊस जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त करण्यात आले होते.
विषारी दारूमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. प्रकरणाचा तपास वेगाने होऊ लागताच माफियांनी कारवाईच्या भीतीने विषारी दारू कालव्यात ओतून दिली. यानंतर सर्वात आधी जवां कालव्यातील विषारी दारू प्यायल्याने 10 कामगारांचा मृत्यू झाला.