उत्तराखंड घटनेतील मृतांचा आकडा वाढला
देश बातमी

उत्तराखंड घटनेतील मृतांचा आकडा वाढला

उत्तराखंड : उत्तराखंड घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून बेपत्ता असल्याची संख्याही वाढली आहे. चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे रविवारी मोठा हिमकडा कोसळला. यामुळे नदीला महापूर आल्यानं पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता झाले असल्याची भीती वर्तवण्यात येत होती. या लोकांचा आकडा आता समोर आला असून 202 लोकं बेपत्ता झाली असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एसडीआरएफ टीम या घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. याठिकाणी काही लोक बोगद्यामध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, टनल उघडण्यासाठी मशीनही याठिकाणी आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती निवारण दल यांच्यासह भारत-तिबेट सीमा पोलीस कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टनलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेसीबीच्या मदतीनं टनलमध्ये पोहोचून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 15 व्यक्तींना वाचवण्यात यश आलं असून 19 लोकांची मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणांहून हाती लागले आहेत. बचावकार्य वेगानं सुरू असून आणखी बरेच लोक टनेलमध्ये अडकल्याचा संशय आहे. उत्तराखंड राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबास 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती, मुख्यमंत्री रावत यांनी दिली आहे. तर, केंद्र सरकारकडून दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.