महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र
बातमी विदर्भ

महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र

नागपूर : जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला महाविकास आघाडी सरकारने मोठा दणका दिला आहे. काटोलच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांना नगरविकास विभागानं अपात्र घोषित केलं आहे. गुंठेवाडी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष आणि गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलचे नियमबाह्य आणि निकृष्ट बांधकाम केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्या कामाच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना काम दिल्याप्रकरणी या सगळ्या नगरसेवकांना नगरविकास विभागाने अपात्र ठरविले. शहरातील गुंठेवारी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष आणि गटनेता यांनी खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलांचे नियमबाह्य व निकृष्ट बांधकाम, त्या बांधकामाच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना कामे दिल्याप्रकरणी या तिघांसह अन्य तीन नगरसेवकांना तसेच पंचवटी येथील म्हाडा कॉलनीतील खुल्या जागेवरील बाजार ओटे तोडल्याप्रकरणी इतर 20 नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अपात्र ठरविले.

या कारवाईमध्ये विदर्भ माझाच्या नगराध्यक्षासह 18 निर्वाचित व दोन नामनिर्देशित नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या कारवाईमुळे विदर्भ माझाच्या चरणसिंग ठाकूर यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

अपात्र ठरविण्यात आलेले नगरसेवक
नगराध्यक्ष वैशाली ठाकूर
उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर
गटनेता चरणसिंग ठाकूर
नगरसेवक सुभाष कोठे
नगरसेवक माया शेरकर
नगरसेवक मीरा उमप
नगरसेवक श्वेता डोंगरे
नगरसेवक किशोर गाढवे
नगरसेवक शालिनी बन्सोड
नगरसेवक राजू चरडे
नगरसेवक लता कडू
नगरसेवक संगीता हरजाल
नगरसेवक सुकुमार घोडे
नगरसेवक वनिता रेवतकर
नगरसेवक देवीदास कठाणे
नगरसेवक शालिनी महाजन
नगरसेवक प्रसन्न श्रीपतवार
नगरसेवक जयश्री भुरसे
नगरसेवक मनोज पेंदाम
निर्वाचित नगरसेवक हेमराज रेवतकर
निर्वाचित नगरसेवक तानाजी थोटे

पक्षीय बलाबल
विदर्भ माझा – 18
शेतकरी कामगार पक्ष – 04
भारतीय जनता पक्ष – 1
एकूण सदस्यसंख्या 23

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील गुंठेवारीबाबत राधेश्याम बासेवार तर खेळाचे आरक्षित मैदान आणि शासकीय जागेवर नियमबाह्य बांधकाम, घरकुलांच्या निकृष्ट कामाबाबत राजेश राठी आणि राधेश्याम बासेवार आणि पंचवटीतील ओटे तोडल्याप्रकरणी नगरसेवक संदीप वंजारी यांनी नगरविकास मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणाची दखल घेत नगरसेवकांना अपात्र ठरवलं आहे.