बस कालव्यात कोसळून 32 जणांचा मृत्यू; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता
देश बातमी

बस कालव्यात कोसळून 32 जणांचा मृत्यू; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

हैद्राबाद : मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळली. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बसममध्ये 54 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा अपघात रामपूरच्या नैकिन परिसरात सकाळी साडेसातच्या आसपास झाला आहे. ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. सतना शहराकडे जात असताना बसला अपघात झाला. मार्गातच असलेलया नैकिनजवळ बस एका कालव्यात कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

एसडीआरएफच्या टीमनं बचावकार्य सुरू केलं आहे. याठिकाणी क्रेनसह अन्य मशीनरीही बोलावल्या गेल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बाणसागर धरणातून कालव्याचे पाणी थांबविण्यात आले आहे. कालव्यातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी त्याचं पाणी सिहावल कालव्यात पाठविलं जात आहे. आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सीधीमधील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून आणि बचावकार्य जलदगतीनं करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.