आम्ही ब्राह्मण, आम्हाला त्याचा गर्व, ब्राह्मण महापुरुष, स्वातंत्र्यासाठी त्यांचं मोठं काम: अमृता फडणवीस
उत्तर महाराष्ट् बातमी

आम्ही ब्राह्मण, आम्हाला त्याचा गर्व, ब्राह्मण महापुरुष, स्वातंत्र्यासाठी त्यांचं मोठं काम: अमृता फडणवीस

नाशिक : “आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्याचाही आम्हाला गर्व आहे. ब्राह्मण बुद्धिजीवी आहेत, ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही, पण जे काम करत जातो त्यातून आमच्या कामाची प्रचिती येते”, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं. अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मम महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरू आहे. जात, धर्म वेगळा ठेवून महासंघ काम करतं म्हणत अमृता फडणवीसांनी महासंघाचं कौतुकही केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या ब्राह्मण समाजाच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल गौरवोद्गार काढले. ब्राह्मण महापुरुष होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भरपूर मोठं काम केलं. पण सध्या ब्राह्मण समाजाला मार्केटिंग जमत नाही. आपल्या वाट्याला आलेलं काम ब्राह्मण इमाने इतबारे करतात, असं अमृता म्हणाल्या. तसेच अखिल भारतीय बहुभाषीय ब्राम्हण महासंघांच्या मागण्यांविषयी मी सकारात्मक असल्याचं सांगत महासंघाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभी असल्याचंही त्या म्हणाल्या.

ज्या नाशिक नगरीने दरवेळी वाईटाचा नाश केला. प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन या नाशिकनगरीत येऊन मी खरोखर धन्य झाले. अखिल भारतीय बहुभाषीय ब्राम्हण महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरु आहे. जात, धर्म वेगळा ठेवून महासंघ लोकांमध्ये जाऊन काम करतो. महासंघ केवळ समाजासाठी नव्हे तर प्रत्येक समाजात काम करताहेत. कोरोनातही पुढे येउन जात, धर्माचा विचार न करता महासंघाने काम केले. समाजाचे काही प्रश्न असतील तर ते मिटले पाहिजे. समाजाच्या इमारत बांधण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यात कोणी अडचण निर्माण करत असेल तर सांगा अधिकाऱ्यांना टाईट करू, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही ब्राह्मण आहोत. स्वाभिमानी आहोत. बुद्धिजीवी आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे. ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही. पण ते काम करत जातो, त्यातून आमच्या कामाची प्रचिती येते. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते ही न मागता. त्यांनी कधीही काही मागितलं नाही. पण त्यांची कार्यपद्धती आणि लोकसेवा पाहून मोदींजींनी आणि वरच्यांनी त्यांना बनवलं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.