मुंबई : मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केली. असा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनासुद्धा हफ्तेखोरीचे टार्गेट दिले होते. साधारण वाझेंना 50 कोटीं दरमहाचे हफ्ताखोरीचे टार्गेट दिले होते, असे परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील तत्काळ ट्विट करीत आपली बाजू मांडली आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असे ट्वीट करत देशमुख यांनी बचाव केला आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021