रत्नागिरी : कशेडी घाटात मोठा अपघात झाल्याची घटना घडली असून ५० फूट खोल दरीत बस कोळली आहे. भोगाव येथे चिंतामणी ट्राव्हल्सची ही बस आहे. अपघातात सात वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून सुमारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
गाडीतील बहुतेक प्रवासी अहमदनगर जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आहेत. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. अपघातग्रस्त बस विरारहून कणकवलीला निघाली होती. बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होते.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात असताना या गाडीला अपघात झाला. त्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर, काही प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ‘१०८’ रुग्णवाहिका व एका स्वयंसेवी संस्थेची रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचली. मदतकार्य अद्यापही सुरू आहे.