कोरोनाचे संकट गडद; पुणे जिल्ह्यातील या शहरात संचारबंदी लागू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचे संकट गडद; पुणे जिल्ह्यातील या शहरात संचारबंदी लागू

पुणे : कोरोनाचे संकट गडद झाले असून समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, असं पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी स्पष्ट केले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा कार्तिकी वारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अलंकापुरीमध्ये ७ तारखेपासून संजीवन समाधी सोहळा सुरू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण आळंदी शहर आणि परिसरात ६ डिसेंबरपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आळंदीत येणाऱ्या दिंडीवर बंदी ठेवण्यात आली असून आळंदीतील धर्मशाळा, हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सोशल डिस्टंसिंग, माक्स वापरणे, सॅनिटायझर फवारणी, असे कोरोना काळातील नियम पाळले जाणार आहेत. अलंकापुरीमध्ये ७ तारखेपासून संजीवन समाधी सोहळा सुरू होणार आहे. मात्र हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. त्यामुळे देशभरातून संजीवन समाधी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांनी आळंदीत न येता घरातूनच संजीवन समाधी सोहळ्यासाठी स्मरण करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी केले आहे.