राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलीत झाले असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसेच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे ते समजत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठा समाजाच्या आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती मिळाली ती या सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अधिवेशनही अवघ्या सात तासांचं घेतलं जातं आहे. त्याला काहीही अर्थ नाही आम्ही जनतेचे प्रश्न कसे मांडायचे? असंही देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे. तसंच या सरकारने वाढीव वीज बिलांबाबत घूमजाव केलं. कोल्हापुरात पुरात वाहून गेलेल्या एका घरालाही अडीच हजारांचं बिल पाठवण्यात आलं आहे त्यावरुनच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. वाढीव वीज बिलांबाबत आणि सरकारच्या या धोरणाबाबत आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मेट्रो कारशेडचं काम हे फक्त आणि फक्त अहंकारातून कांजूरमार्गला हलवण्यात आलं. फक्त राजकीय आकसापोटी सुरु असलेल्या योजना हे सरकार बंद करतं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.