कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; भारत बंद’नंतर आज शेतकऱ्यांचे उपोषण
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; भारत बंद’नंतर आज शेतकऱ्यांचे उपोषण

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आज शेतकारी आंदोलनाचा १९ वा दिवस आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. मात्र भारत बंद आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणीही धरणे आंदोलनही केलं जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पत्रकार परिषदेत माहिती देताना शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की,14 डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याची योजना आहे. आजपासून सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण केले जाणार आहे. तसेच, सर्व शेतकरी नेते आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत.

त्याचबरोबर ज्या संघटनांनी आंदोलन मागे घेतले आहे त्या संघटनांबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ”ज्या संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, ते सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. याबाबत आम्ही स्पष्ट करतो की, ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचे सरकारसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आमचं आंदोलन कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचलं आहे. सरकार शेतकऱ्यांचं हे आंदोलन संपवण्याचा कट रचत आहे.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे की, ते शतकऱ्यांसोबत सोमवारी एक दिवसाचे उपोषण करणार आल्याची माहिती मिळाली आहे. “काही केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते म्हणत आहेत की, शेतकरी आंदोलन राष्ट्राच्या विरोधी आगे. अनेक माजी सैनिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, गायक, दिग्गज, डॉक्टर, व्यापारी शेतकऱ्यांचं समर्थन करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, मग हे सर्व लोक देशद्रोही आहेत का?” असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. तसेच, त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थकांना एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन केलं आहे.

शेतकरी नेते संदीप गिड्डी म्हणाले की, “19 डिसेंबरपासून शेतकऱ्यांचं अनिश्चित काळासाठी केलं जाणारं उपोषण रद्द करण्यात आलं आहे. त्याऐवजी सर्व शेतकरी सोमवारी दिवसभर उपोषणाला बसणार आहेत.” तर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, “जर सरकार चर्चा करण्यासाठी आणखी एकदा प्रस्ताव पाठवणार असेल, तर आमची कमेटी यावर नक्की विचार करेल. आम्ही सर्वांना आंदोलन करताना शांती राखण्याचं आवाहन करतो.”