राज्यातील काही भागात यलो अलर्ट; ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
बातमी महाराष्ट्र

राज्यातील काही भागात यलो अलर्ट; ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात थोड्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुढील ३ दिवस महत्वाचे असून या भागांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बुधवारी (ता. २२) राज्यात कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढ होणार आहे.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्याच्या घाट भागात गुरुवारपर्यंत (२३ सप्टेंबर) मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर, वातावरण अंशतः ढगाळ राहील. त्याचप्रमाणे, अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कायम राहील.

राज्यात परतीचा पाऊस लांबणीवर
सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात परतीचा पाऊस लांबणीवर पडला असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.