नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी देशात मृत्यूचे थैमान सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी देशात मृत्यूचे थैमान सुरुच

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला असून नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी मृत्यूचे थैमान सुरुच असल्याचे दिसत आहे. अद्यापही मृत्यूचा आकडा चार हजारांच्या पुढेच असल्याचे चित्र आहे. देशात दररोज साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात काल दिवसभरात तीन लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४ हजार ०३७ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

देशात झालेल्या एकूण ४,०३७ मृत्यूंपैकी ९६० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. सध्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यूदर वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात काल ५९ हजार ७३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ३४ हजार ८४८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा ८३.८३ टक्के आहे. भारतात नवीन कोरोना रुग्णांची संख्या पाच दिवसांत चौथ्यांदा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. दहा राज्यांत बरे होण्याचा दर ७०.४९ टक्के आहे. देशात एकूण बळींची संख्या २ लाख ७० हजार २८४ आहे. तर एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ४६ लाख ८४ हजार ०७७ इतकी आहे.