देशात कोरोना बळींचा आकडा कमी होईना; तर २४ तासांत एवढ्या रुग्णांची नोंद!
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोना बळींचा आकडा कमी होईना; तर २४ तासांत एवढ्या रुग्णांची नोंद!

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा अक्षरशः कोरोनाचा कहर सुरु असून बळींचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर नव्या रुग्णांची नोंदही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत देशात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात १६ लाख ७९ हजार ७४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल १ लाख ७५ हजार ६४९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर
राज्यात शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ कोरोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. शुक्रवारी ४५ हजार ३३५ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात एकूण ३० लाख ०४ हजार ३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.