रस्ते-पाणी आणि नोकऱ्या, जतमधील ४२ गावांना कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिकाच्या पायघड्या
बातमी महाराष्ट्र

रस्ते-पाणी आणि नोकऱ्या, जतमधील ४२ गावांना कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिकाच्या पायघड्या

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणी प्रश्न आणखी पेटणार आहे. कर्नाटकमध्ये जाण्याच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही, मात्र कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने थेट जत तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीची भेट घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेचे नेते सिद्धू वडेयार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रात येऊन पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार यांची भेट घेतली. सत्कार करत त्यांना भुवनेश्वरी देवीची प्रतिमा भेट दिली, तसेच कर्नाटकात येण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

त्याचबरोबर कर्नाटकात आल्यानंतर जत तालुक्याला पाणी, रस्ते वाहतूक, मूलभूत सुविधा देणे, बेरोजगार युवकांना नोकऱ्या देणे, नागरी सुविधा देणे यासाठी संघर्ष समितीच्या पाठीशी सदैव उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.

जत तालुका पाणी संघर्ष समितीने आठ दिवसांत पाणी देण्यासाठी कॅबिनेटची मीटिंग बोलावून निर्णय जाहीर करा अन्यथा आम्ही कर्नाटकात जाणार असा अल्टिमेटम महाराष्ट्र सरकारला दिला होता.

मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी जत तालुक्यातले ४२ गावे कर्नाटक मध्ये येणार असल्याचं विधान केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी जत तालुक्यातील कोणतीच गावा कर्नाटकात जाणार नसल्याचा स्पष्ट केले होते.

मात्र, प्रत्यक्षामध्ये ४२ गावातल्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाणी संघर्ष कृती समितीने वेगळी आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी देणार नसेल आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, अशी भूमिका जाहीर करत, याबाबत उमदी मध्ये शुक्रवारी दुष्काळी गावातल्या ग्रामस्थांची बैठक घेतली.

ग्रामस्थांचं म्हणणं काय?

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानाचे स्वागत करत त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाचा जयघोषही करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एक पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी ४२ गावांसाठी कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडण्याबाबत सामंजस्य करार करु शकतात,पण तो का होऊ शकतो? असा सवाल करत जगायला पाणी मिळत नसले तर कोणतेही सरकार काय करायचे ? आणि आम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये जात नाही. शेजारच्या राज्यात जात आहोत, असे ग्रामस्थांनी म्हटले.