राज्यात ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण; १४५ जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण; १४५ जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १४५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज राज्यात ४ हजार ७८० कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपर्यंत राज्यात ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ५३ हजार १८२ बाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २२लाख ९२हजार १३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४लाख २४ हजार ६५१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.