राज्यात पुन्हा चार हजाराहून अधिक रुग्णांची नोंद; ४४ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा चार हजाराहून अधिक रुग्णांची नोंद; ४४ मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात ४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ५२४ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. याशिवाय, ४४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ९९ हजार ७६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४ लाख ९१ हजार १७९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १लाख ३८हजार ०६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५७ लाख ०२ हजार ६२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९१ हजार १७९ (११.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९६ हजार ५७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ९५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ८१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.