मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज तर कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. राज्यभरात आज तब्बल 11 हजार 141 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही वाढती रुग्णसंख्या शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात आज 11141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6013 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2068044 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97983 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.17% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 7, 2021
राज्यात आज 38 करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मतृयदूर 2.36 टक्के एवढा आहे. दुसरीकडे, राज्यात आज 6 हजार 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.17 टक्के एवढे आहे.
औरंगाबादमध्ये प्रशासनाकडून कठोर निर्णय
औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे. 15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण लॉक डाऊन करण्यापेक्षा अंशतः लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. त्यानंतरही कोरोना रुग्ण वाढले तर कडक लॉकडाऊन लावण्यात येईल,’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.