राज्यात कोरोनाग्रस्तांचा नवा विक्रम; ओलांडला २५ हजारांचा टप्पा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाग्रस्तांचा नवा विक्रम; ओलांडला २५ हजारांचा टप्पा

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर नवे कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. त्यामुळे राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. आज(ता. १९) राज्यात दिवसभरात २५ हजार ६८१ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ७७ हजार ५६० इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या ३ दिवसांत राज्यात तब्बल ७४ हजाराहून जास्त नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र, यासोबतच आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

एकीकडे नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. आज राज्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा पुन्हा वाढून ७०वर गेला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर वाढून २.२० टक्क्यांपर्यंत गेला आहे.