राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; तर दिवसभरात ५२ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; तर दिवसभरात ५२ मृत्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात आज काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही कालच्या तुलनेत निम्मी घट झाल्याचे दिसून आले. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यभरात आज ३ हजार ७४१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ६८ हजार ११२ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६४ लाख ६० हजार ६८० झाली आहे. आजपर्यंत राज्यात १लाख ३७ हजार २०९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३८ लाख १२ हजार ८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६० हजार ६८०(१२.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८८ हजार ४८९ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार २९९ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१ हजार ८३४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.