मुंबई : राज्यात मागील २४ तासांत ४ हजार १३० नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ५०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ६४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८८ हजार ८५१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७७०७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझटिव्हि आले आहेत. सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०१३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ अॅक्टिव्ह आहेत.