राज्यात पुन्हा ४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; ५५ रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; ५५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात पुन्हा ४ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४ हजार २१९ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर २ हजार ५३८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शिवाय, ५५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ९५ हजार २३६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४ लाख ८७ हजार ०२५ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १लाख ३८हजार ०१७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५५ लाख १९ हजार ६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८७ हजार ०२५(११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ५१० व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत. तर १ हजार ९१९ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणता आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५० हजार २२९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.