दिलासादायक! मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र होते. दरम्यान, आज हा आकडा काहीसा खाली आला आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०२ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात १७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५१ हजार ५७४ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर काळजी करण्याचे आवाहन केले आहे.