राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; ४ हजार ८६९ नवीन कोरोनाबाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; ४ हजार ८६९ नवीन कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात मागील २४ तासांत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यासाठी हे दिलासादायक आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन कोरोनाबाधित आढळले तर, ८ हजार ४२९ रूग्ण कोरोनातून बरे झाले. याशिवाय, आज ९० रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ०३ हजार ३२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. तर, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख १५ हजार ०६३ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १ लाख ३३ हजार ०३८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८३ लाख ५२ हजार ४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख १५ हजार ०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६१ हजार ६३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७५ हजार ३०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.