राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ५ हजारांच्या वर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ५ हजारांच्या वर

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ५ हजारांच्या वर गेला आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार १३२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ हजार १९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, आज १५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ०९ हजार ३६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४ हजार ०६ लाख ३४५ झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत १ लाख३५ हजार ४१३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १४ लाख ८९ हजार ८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ०६ हजार ३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ४६ हजार २९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५८ हजार ६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.