मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरु असला तरी राज्यातील आकडेवारी दिलासादायक असल्याचे समोर येत आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असला तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात आजपर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.
राज्यात आज 53605 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 82266 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4347592 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 628213 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.03% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 8, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९१ लाख ९४ हजार ३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५० लाख ५३ हजार ३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ५० हजार ५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६ लाख २८ हजार २१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.