दिलासादायक! राज्यात २४ तासांत ८० हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यात २४ तासांत ८० हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरु असला तरी राज्यातील आकडेवारी दिलासादायक असल्याचे समोर येत आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असला तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९१ लाख ९४ हजार ३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५० लाख ५३ हजार ३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ५० हजार ५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६ लाख २८ हजार २१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.