मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होतना दिसत नाही. दररोज मोठमोठे आकडे समोर येत आहेत. रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी भर पडत असून मृत्यूचा आकडा वाढला आहे. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६३ टक्के एवढा आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दरम्यान, आज ५३ हजार ३३५ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ०५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.३ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज 61,695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 53335 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2959056 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 620060 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.3% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 15, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६ लाख ३९ हजार ८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ८७ हजार ४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.