मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असून कोरोनाग्रस्तांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. दररोज मोठमोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे काहीसे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ८४२ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ६२ हजार १९४ नवीन करोनाबाधित आढळले आहे. तर, ८५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४२,२७,९४० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.५४% एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८६,६१,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,४२,७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,२६,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३९,०७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.