राज्यात ६ हजार ९१० कोरोनाग्रस्तांची नोंद; १४७ रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ६ हजार ९१० कोरोनाग्रस्तांची नोंद; १४७ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असताना मोठ्या संख्येने रूग्ण कोरोनातून बरे होत आहेत. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ५१० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ६ हजार ९१० नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १४७ कोरोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९११ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार ७५३ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५८ लाख ४६ हजार १६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ हजार २९ लाख ५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ९४ हजार ५९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.