मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासांत राज्यात ६ हजार ९७१ करोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण कोरोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी कोरोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 6971 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2417 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1994947 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52956 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 21, 2021
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,५७,२०,२५९ (१३.३६ टक्के) नमुन्यांपैकी २१ लाख ८८४ नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ५६३ जण गृहविलगीकरणात तर १ हजार ७३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अनेक शहारांमध्ये संचारबंदी तर काही ठिकाणी लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत.