राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; तर २३१ मृत्यूंची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; तर २३१ मृत्यूंची नोंद

मुंबई : राज्यात मागील २४ तासात राज्यभरात ८ हजार ६२३ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ८ हजार ८५ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, २३१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने नवीन रुग्णांच्या संख्येत चढ उतार होताना दिसत आहे. सोमवारी झालेल्या रुग्णवाढीपेक्षा मंगळवारी नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ झालेली दिसून आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ०९ हजार ५४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १३ लाख ९८ हजार ५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ५१ हजार ६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २१ हजार ३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १७ हजार ०९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.