कोरोनाचा धोका वाढला; दिवसभरात राज्यात ६० जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा धोका वाढला; दिवसभरात राज्यात ६० जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडत आहे. आज (ता. ०४) दिवसभरात ८ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आजपर्यंत एकूण २० लाख ४९ हजारल ४८४ कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९६ हजार ३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ८८ हजार १८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ९१ हजार २८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५ हजार १४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.