दिलासादायक ! राज्यात ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित; ५४९ मृत्यूची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित; ५४९ मृत्यूची नोंद

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात एक दिलासादायक बाब समोर येत असन मोठ्या संख्येने रूग्ण केरोनामुक्त होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र पाहायाला मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६०७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ३७ हजार २३६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४४ लाख ६९ हजार ४२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.९७% एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ७६ हजार ३९८ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९६ लाक ३१ हजार १२७ नमुन्यांपैकी ५१ लाख ३८ हजार ९७३ (१७.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५ लाख ९० हजार ८१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.