ईडीची कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त
बातमी महाराष्ट्र

ईडीची कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

मुंबई : ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकांचा आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे अजित पवारांना मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसल मंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता. शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, हा लिलाव हेतू पुरस्कृत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने ही कारवाई केली आहे.

याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.