दिलासादायक! राज्यातील मृतांच्या आकड्यात घट; नव्या रुग्णांची आकड्यातही घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यातील मृतांच्या आकड्यात घट; नव्या रुग्णांची आकड्यातही घट

मुंबई : कोरोनामुळे सगळीकडे हाहाकार माजला असताना राज्यातील मृतांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज दिवसभरात ४२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रमाण ४५३ इतकं होतं. तसेच, गेल्या आठवड्याभरात हे प्रमाण सातत्याने ५००च्या वर राहिलं आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आज दिवसभरात राज्यात २१ हजार २७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांत ६० हजारांवरून २१ हजारांवर आलं आहे. त्यासोबतच आज दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९३.०२ टक्के इतका वाढला आहे!

राज्यात आजघडीला एकूण ३ लाख १ हजार ०४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८० इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ९२ हजार २२५ इतका झाला आहे.