कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; मृत्यूचा आकडाही घटला
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; मृत्यूचा आकडाही घटला

मुंबई : मागील काही दिवसाच्या तुलनेत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (ता. ०५) काही प्रमाणात घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. तुलनेत राज्यातील मृत्यूचा आकडाही घटला आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ९२२ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात मागील २४ तासात ५ हजार ८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ लाख १५ हजार ८८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ५ हजार ११८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४७ हजार ५०९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ६८५ व्यक्ती होम क्वारंटाइडन आहेत. तर ५ हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८२ हजार ८४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९२२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ इतकी झाली आहे.