मुंबई : महाराष्ट्रात काल (ता. ०३) दिवसभरात ८ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळेल राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही १७ लाख ३ हजार २७४ झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९२.७० टक्के इतका झाला असून काल राज्यात राज्यात ५ हजार १८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात काल एकूण ११५ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा २.५८ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १० लाख ५९ हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३७ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार १३७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ९३९ संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८५ हजार ५३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ इतकी झाली आहे.