वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण
बातमी मुंबई

वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा गाजत असतानाच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी का केली? याची माहिती एनआयएने दिली आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा दाबून नव्हे तर श्वास कोंडल्यानं झालेला आहे. त्यांच्या मृतदेहावर अशा कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालातून हे निश्चित होईल. जेव्हा मृतदेह त्यांचा मृतदेह वाहून आला, तेव्हा त्यांच्या तोंडातून अनेक हातरुमाल बाहेर काढण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्फोटकांनी भरलेली गाडी आढळण्यापूर्वी हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी वाझे यांना दिली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन कार चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी केली होती. दरम्यान, हिरेन यांच्या हत्येत सहभाग नसल्याचं वाझेंकडून सांगितलं जात असलं, तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत, असे सांगण्यात येत आहे. कॉल डेटा रेकॉर्ड, हत्येत सहभागी असलेल्या लोकांचं लोकशन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुराव्यातून वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रकरणात सहभाग असल्याचंच दिसून येत असल्याचे एनआयएनं सांगितेले आहे.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर वाझेंकडून हिरेन यांच्यावर गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाब आणला जात होता. अंबानी स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यासाठी विरोधकांकडून सरकारवर दबाब आणला जात होता. त्याच काळात हे प्रकरण एटीएसकडे जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे हिरेन प्रकरण स्वतःच्या नावावर घ्यायला तयार नव्हते. एनआयएकडे तपास जाण्याच्या भीतीने वाझे घाबरले होते. त्यातून त्यांनी हिरेन यांची हत्या केली. आता आम्ही हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथे होते का? याचा तपास केला जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.