अनिलकुमार गायकवाड यांची एमएसआरडीसीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
बातमी मुंबई

अनिलकुमार गायकवाड यांची एमएसआरडीसीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनिलकुमार गायकवाड हे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते/ बांधकामे) सचिव पदावरून सेवा निवृत्त झाले. त्यांचे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खूप मोठे योगदान असुन.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग चे काम सुरुवाती पासून ते आज पर्यंत श्रीअनिलकुमार गायकवाड यांचा समृद्धी महामार्गाच्या कार्यात मोठा सहभाग आहे. जमीन अधिग्रहण पासून ते रस्ते तयार होई पर्यंत ची सर्व तांत्रिक बाजू भक्कम पणे त्यांनी सांभाळी आहे.जवळ पास समृद्धी महामार्गाचे काम ८५% काम पूर्ण झाले असुन.राहिलेले उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी साधारण आणखी दोन वर्षाचा कालावधी लागेल त्या साठी श्री गायकवाड यांना सेवानिवृत्ती नंतर त्यांची कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांना एम एस आर डी सी च्या सह- व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती दिली आहे जेणे करून महामार्गाचे काम जलदगती ने पूर्ण होण्यासाठी ते अत्यंत आवश्यक होते. महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केल्याने समृद्धी महामार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल.

श्री गायकवाड यांची ओळख त्यांनी केलेल्या अनेक महत्त्वाच्या कामातुन आहे त्यापैकी पुणे मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबई तील सी-लिंक पुल, मुंबई आणि ठाणे शहरातील जवळपास सर्व उड्डाण पुले, समृद्धी एक्स्प्रेस वे,मुंबई मधील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्र च्या मंत्रालय चे आधुनिकीकरण केलेली ईमारत,मुंबई हायकोर्ट इमारत दुरुस्ती,हाई माऊंट बिल्डिंग, सह्याद्री इमारत,विशेष म्हणजे देशाच्या राजधानी दिल्ली येथील नविन “महाराष्ट्र सदन”, नुकतेच लातुर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धाटन केलेले देशातील पहिले नवीन टेकनॉलाजी चे हायब्रीड पुल, देशातील नदीवर तयार केलेले सर्वांत उंच लोखंडी पुल, देशातील सर्वाधिक लांब असा आठ किलोमीटर चा बोगदा ,असे अनेक महत्त्वाकांक्षी कामे श्री गायकवाड यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उत्कृष्टपणे हाताळले आहेत अभियंता श्री अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी केले आहेत.त्यांच्या अनुभवाचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा निश्चितच राज्याला होईल . त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.