कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हिंगोलीकरांची दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिंगोलीत कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्याचबरोबर कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेली वर्षेभर येणाऱ्या मृत्यू न झालेले दिवस आरोग्य यंत्रणेला कमालीचा आनंद देणारा आहे. हे हिंगोली प्रशासनाचे मोठे यश मानले जात आहे. यापूर्वीही हिंगोली प्रशासनाने कोरोनाविरोधी लढ्यात कायम आघाडी घेतलेली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
हिंगोलीत आता केवळ ११ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात कोरोना प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी योजिलेल्या उपाययोजनांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. पायाभूत सुविधांमध्ये कमालीचा मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेण्यासाठी विलगीकरण आणि अलगीकरण कक्ष आणि त्याची अंमलबजावणी अधिक चांगली होण्यासाठी जयवंशी यांनी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांना मोठे यश आले होते. आता कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र असून जयवंशी यांच्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा हिंगोलीकरांत सध्या चालू आहे.
जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी सक्रिय रुग्णसंख्या एक हजार ३२३ होती. त्या तुलनेत निर्माण केलेल्या सुविधा आणि तिसऱ्या लाटेचीही तयारी सुरू असताना हिंगोलीतील संसर्ग आटोक्यात येत ओह. आतापर्यंत १५ हजार ९५३ रुग्ण आल्याची नोंद होती. त्यापैकी १५ हजार ५५२ रुग्ण बरे झाले. मराठवाडय़ातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानेही चांगले काम केले. प्राणवायू सुविधाही आता वाढविण्यात आल्या आहेत.