कोल्हापूरच्या अंबामातेच्या विना रांग दर्शनाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, VIP रांगेबाबतही आला आदेश
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूरच्या अंबामातेच्या विना रांग दर्शनाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, VIP रांगेबाबतही आला आदेश

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे (Shree Karveer Niwasini Ambabai) तातडीने विना रांगेत दर्शन घ्यायचे असेल तर दोनशे रुपये घेऊन पास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला होता. मात्र, न्यायालयाने त्याला परवानगी नाकारल्याने आता सर्वांनाच दर्शन रांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. दरम्यान व्हीआयपी भाविकांना स्वतंत्र रांग नको असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन तातडीने घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यंदा पेड ई पास देण्याचा निर्णय घेतला होता. दोनशे रुपये घेऊन हा पास दिला जाणार होता. पण यास कोल्हापुरातील काही संघटनांनी जोरदार विरोध केला. ज्याना तातडीने दर्शन पाहिजे त्यांना दर्शन मिळेल आणि देवस्थान समितीला चांगला निधी मिळेल असे सांगून ई पास देण्याचा घाट घालण्यात आला. त्याला विरोध झाल्यानंतरही तो रेटण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

कोर्टाने नाकारली परवानगी

या निर्णयास दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंगेल यांनी परवानगी नाकारली आहे. पेड पास बरोबरच व्हीआयपी साठी स्वतंत्र दर्शन रांगही केली जाऊ नये असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे देवीच्या दर्शनासाठी पेड पास देण्याचा निर्णय आता देवस्थान समितीला मागे घ्यावा लागेल. याबाबत पुजारी गजानन मुनेश्वर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अशी होते घटस्थापना

श्री करवीर निवासीनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये दर शुक्रवारी अंबामातेचा पालखी सोहळा होत असतो. त्यावेळी मंदिरामध्ये तोफ डागण्यात येते. यानंतरच पालखी सोहळ्याला प्रारंभ होतो. त्याच प्रमाणे नवरात्रोत्सवातही तोफेची सलामी देण्यात येते. पहाटे ४ वाजता अंबाबाई मंदिराची दारवाजे उघडले जातात. त्यानंतर घटस्थापनेसाठी पूजेची तयारी करण्यात येते. दरम्यान सकाळच्या सुमाराला मंदिराच्या परिसरात धनाजी जाधव यांच्याकडून तोफेची सलामी देण्यात येते. त्यानंतरच नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असे जाहीर करण्यात येते. या कार्यक्रमानंतर अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना होत असते.